मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२६
Englishहिन्दीMarathi
City News Mumbai
City News Mumbai
मुख्यपृष्ठई-पेपरव्हिडिओराष्ट्रीयमुंबईराजकारणखेळआरोग्यतंत्रज्ञान
टॉपराष्ट्रीयमुंबईराजकारणखेळआरोग्यतंत्रज्ञान

सिटी न्यूज मुंबई

मुंबईची प्रत्येक बातमी, सर्वात आधी

श्रेणी

  • स्थानिक
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • व्यवसाय
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • आरोग्य
  • शिक्षण

जलद दुवे

  • मुख्यपृष्ठ
  • ई-पेपर
  • व्हिडिओ
  • आजची छायाचित्र
  • आमच्याबद्दल
  • संपर्क करा
  • गोपनीयता धोरण
  • सेवा अटी

न्यूजरूम

  • संपादकीय धोरण
  • सुधारणा आणि तक्रारी
  • आमच्याशी जाहिरात
  • न्यूजरूम संपर्क

भाषा

  • English
  • हिन्दी (Hindi)
  • मराठी (Marathi)

आम्हाला फॉलो करा

Email: citynewsmumbai@gmail.com

Phone: 9869128483

© 2026 City News Mumbai. सर्व हक्क राखीव

Designed and Developed byZeloiteZeloite
पर्युषण काळातील मांस-मासे विक्री बंदी मागे घ्या; मराठी एकीकरण समिती आक्रमक
  1. मुखपृष्ठ
  2. महाराष्ट्र
महाराष्ट्र

पर्युषण काळातील मांस-मासे विक्री बंदी मागे घ्या; मराठी एकीकरण समिती आक्रमक

City News Mumbai•८ सप्टेंबर, २०२६ रोजी ०५:५७ AM वाजता•92 व्ह्यूज•2 मिनिट वाचा

“मी शाकाहारी आहे म्हणून सर्वांनी मांस-मासे विक्री बंद करावी, हा तुघलकी निर्णय आहे

मीरा-भाईंदर, दि. ८ सप्टेंबर (सिटी न्यूज़ मुंबई)

पर्युषण काळात मांस व मासे विक्रीवर दोन दिवसांची बंदी घालण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला मराठी एकीकरण समितीने तीव्र विरोध केला आहे. हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी समितीच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेऊन केली.

शहरात धार्मिक तेढ, संघर्ष किंवा दंगलीची परिस्थिती निर्माण होईल असे निर्णय घेऊ नयेत. धर्म प्रत्येकाने स्वतः जपावा; मात्र तो इतरांवर लादू नये, अशी भूमिका समितीने मांडली. भारताच्या संविधानाने नागरिकांना दिलेले खान-पानाचे स्वातंत्र्य लक्षात घेऊन कोणत्याही नागरिकावर अशा प्रकारचे बंधन घालू नये, असेही समितीने स्पष्ट केले.

जैन समाजाच्या पर्युषण पर्वाचा सन्मान असला तरी त्यासाठी स्थानिक आगरी-कोळी समाजातील मासे विक्री करणाऱ्या महिलांच्या उदरनिर्वाहाचा विचार कोण करणार?, असा सवाल समितीने उपस्थित केला. दोन दिवसांची विक्री बंद झाल्याने रोजच्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या कुटुंबांवर त्याचा परिणाम होणार असल्याचे समितीने सांगितले.

समितीचे गोवर्धन देशमुख यांनी महापालिकेच्या निर्णयावर सवाल उपस्थित करताना म्हटले, “मी टोपी घालतो म्हणून आयुक्तांनी आणि अतिरिक्त आयुक्तांनीही टोपी घालावी, हे चालेल का? मग एका व्यक्तीच्या किंवा समाजाच्या आहाराच्या पद्धतीनुसार संपूर्ण शहरावर निर्णय कसा लादता येईल?”

“मी शाकाहारी आहे म्हणून सर्वांनी मांस-मासे विक्री बंद करावी, हा तुघलकी निर्णय आहे. महापालिकेने काढलेले पत्रक तातडीने मागे घ्यावे. ही दोन दिवसांची बंदी आम्हाला मान्य नाही,” अशी स्पष्ट भूमिका समितीने घेतली.

महापालिका ठराव करते म्हणून तो निर्णय नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्यावर लादता येत नाही. उद्या बहुमताच्या जोरावर कोणताही वेगळा ठराव करून संपूर्ण शहरावर तो लादला तर त्याला काय अर्थ राहील, असा प्रश्नही समितीने उपस्थित केला.

“आपण इंग्रजांच्या राजवटीत नाही. आपण लोकांच्या सेवेसाठी नेमलेले सेवेकरी आणि लोकप्रतिनिधी आहोत, याचे भान महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी ठेवावे,” असे सांगत नागरिकांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने केली.

समितीने महापालिका प्रशासनाला मांस-मासे विक्री बंदीचा निर्णय मागे घेऊन शहरातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा कायम ठेवावा, असे आवाहन केले आहे.

शेअर करा:

More from महाराष्ट्र

गणपतीची पौराणिक वारसा: इतिहास, संस्कृती आणि समकालीन महत्त्व
महाराष्ट्र

गणपतीची पौराणिक वारसा: इतिहास, संस्कृती आणि समकालीन महत्त्व

८ सप्टें, २०२६
भिवंडीमध्ये अपहरणाच्या 4 केस नोंदवले, 2 नाबालिग किशोरवयीनांसह महिला आणि युवक गहाळ
महाराष्ट्र

भिवंडीमध्ये अपहरणाच्या 4 केस नोंदवले, 2 नाबालिग किशोरवयीनांसह महिला आणि युवक गहाळ

६ सप्टें, २०२६
धागा 35% महाग, कपड्यांची मागणी कमी; भिवंडीच्या पावरलूम उद्योगावर संकट
महाराष्ट्र

धागा 35% महाग, कपड्यांची मागणी कमी; भिवंडीच्या पावरलूम उद्योगावर संकट

६ सप्टें, २०२६
भिवंडीमध्ये धूमधडाक्याने मनी दहीहंडी, गोविंदांनी सात ते नऊ थर लावले
महाराष्ट्र

भिवंडीमध्ये धूमधडाक्याने मनी दहीहंडी, गोविंदांनी सात ते नऊ थर लावले

६ सप्टें, २०२६
मुंबईत २४×७ कचरा संकलन पायलट प्रकल्प सुरू, बँद्रात नवीन उपक्रम
महाराष्ट्र

मुंबईत २४×७ कचरा संकलन पायलट प्रकल्प सुरू, बँद्रात नवीन उपक्रम

५ सप्टें, २०२६
मुंबईमध्ये नवीन मेट्रो लाईनच्या उद्घाटनामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत बदल
महाराष्ट्र

मुंबईमध्ये नवीन मेट्रो लाईनच्या उद्घाटनामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत बदल

५ सप्टें, २०२६