रविवार, ३० ऑगस्ट, २०२६
Englishहिन्दीMarathi
City News Mumbai
City News Mumbai
मुख्यपृष्ठई-पेपरव्हिडिओराष्ट्रीयमुंबईराजकारणखेळआरोग्यतंत्रज्ञान
टॉपराष्ट्रीयमुंबईराजकारणखेळआरोग्यतंत्रज्ञान

सिटी न्यूज मुंबई

मुंबईची प्रत्येक बातमी, सर्वात आधी

श्रेणी

  • स्थानिक
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • व्यवसाय
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • आरोग्य
  • शिक्षण

जलद दुवे

  • मुख्यपृष्ठ
  • ई-पेपर
  • व्हिडिओ
  • आजची छायाचित्र
  • आमच्याबद्दल
  • संपर्क करा
  • गोपनीयता धोरण
  • सेवा अटी

न्यूजरूम

  • संपादकीय धोरण
  • सुधारणा आणि तक्रारी
  • आमच्याशी जाहिरात
  • न्यूजरूम संपर्क

भाषा

  • English
  • हिन्दी (Hindi)
  • मराठी (Marathi)

आम्हाला फॉलो करा

Email: citynewsmumbai@gmail.com

Phone: 9869128483

© 2026 City News Mumbai. सर्व हक्क राखीव

Designed and Developed byZeloiteZeloite
जिल्हा व शहर काँग्रेसच्या निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर अन्याय
  1. मुखपृष्ठ
  2. राजकारण
राजकारण

जिल्हा व शहर काँग्रेसच्या निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर अन्याय

City News Mumbai•३० ऑगस्ट, २०२६ रोजी ०३:०७ PM वाजता•5 व्ह्यूज•3 मिनिट वाचा

बालाजी चव्हाण यांची काँग्रेस महाराष्ट्र सहप्रभारी रिहाना चिश्ती यांच्याकडे गंभीर तक्रार


नांदेड :- (प्रतिनिधी) -

नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डावलून खा.रवींद्र चव्हाण यांनी मोठा अन्याय केला असून आयाराम गयारामांची महत्वाच्या पदांवर वर्णी करून पक्षाला भाजपच्या दावणीला बांधले आहे.या सर्व प्रकाराची चौकशी करून निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय द्यावा अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी बालाजी चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र सह प्रभारी रिहाना चिश्ती यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.नांदेड दौर्‍यावर आलेल्या रिहाना चिश्ती यांची प्रत्यक्ष भेट घेवून बालाजी चव्हाण यांनी निवेदन सादर केले की,मागील २ वर्षामध्ये काँग्रेस पक्षामध्ये भाजप पक्षाचे स्पीपर सेल म्हणून (बी. टीम) काम करणार्‍या बंडखोर कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाच्या खा. रविंद्र चव्हाण यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बंडखोरांना पदे दिली असल्यामुळे काँग्रेस पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांचे मन दुखावले असून त्यांच्यावर अन्याय केला आहे. मागील 13 नगरपालीकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही,अनेक ठिकाणी उमेदवारच मिळाले नाहीत आणि ज्या लोकांना उमेदवारी देण्यात आली ते उमेदवार मोठ्या मतांच्या फरकाने पराभूत झाले आहेत.खा.रविंद्र चव्हाण यांच्या लोकसभा मतदार संघामध्ये एकही नगरपालिका व नगरपंचायत मध्ये नगराध्यक्ष निवडुन आलेला नाही तसेच 185 जागांवर उमेदवारी दिली पण केवळ 47 नगरसेवक निवडुन आले व बाकी सर्व उमेदवारांचा पराभव झाला.पक्षाचा एकही स्टार प्रचारक प्रचारासाठी बोलावण्यात आले नाही.त्यानंर नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकी मध्ये सुद्धा अशाच प्रकारचे गलीच्छ राजकारण करून काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आले आणि आवश्यकता नसताना वंचित बहुजन आघाडी सोबत युती करून काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांवर विशेषतः बहुजन समाजातील कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय करण्यात आला.त्यामुळे पक्षातील अनेक बहुजन पदाधिकारी पक्ष सोडून इतर पक्षामध्ये गेले तर काही जण घरी बसले आणि पक्षातील कार्यकर्त्यांना ए.बी.फॉर्म देताना अनेक चुका केल्यामुळे सर्वच समाजाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याने समाज त्यांच्यावर प्रचंड नाराज होता.त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज हा काँग्रेसपासून दूर गेला आणि नांदेड महानगरपालीका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून ३ ते ४ वेळेस निवडुन आलेले नगरसेवक काँग्रेस पक्ष सोडून एमआयएम मध्ये गेले. त्याठिकाणी एम.आय.एम पक्षाचे १४ नगरसेवक निवडुन आले. त्यातील बहुतांश नगरसेवक हे काँग्रेसचेच होते.मा.शहराध्यक्ष अब्दुल सत्तार यांना काँग्रेस पक्षाने महापौर,विरोधी पक्ष नेता, विधानसभेचे उमदेवारी दिली व त्यांचा मुलगा अब्दुल गफ्फार हे उपमहापौर होते.एवढे सर्व एकाच परिवारात दिल्यामुळे मुस्लिम समाजातील इतर पदाधिकारी नाराज होवून काँग्रेस पक्ष सोडून गेले.शहराध्यक्ष अब्दुल सत्तार यांना विधानसभेची उमेदवारी दिल्यानंतर सुद्धा त्यांनी कोणत्याच काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता निवडणुक लढवली.या सर्व बाबींचा विचार करून आपण काँग्रेस पक्षाच्या बंडखोरांवर भाजपातून आलेले (बी.टीम.) यांची हकालपट्टी करावी व काँग्रेस पक्षातील निष्ठावंत,प्रामाणिक आणि ज्येष्ठ पदाधिकार्‍यांची वर्णी लावावी आणि जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष वाचवावा अशी मागणी बालाजी चव्हाण यांनी केली आहे.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये खा.रविंद्र चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांची बैठक न बोलावता,काँग्रेसचे पॅनल उभे न करता भाजपाचे खा.अशोकराव चव्हाण यांच्याशी संगनमत करून स्वतःचे सख्खे काका व मामी यांना बिनविरोध निवडुन आणून काँग्रेसमधील भोकर,मुदखेड, अर्धापूर व नांदेड मधील उमेदवारांना वार्‍यावर सोडले.जर पॅनेलकडून लढवले असते तर निश्चित आपले 7-8 उमदेवार निवडून आले असते असा आरोपही बालाजी चव्हाण यांनी केला आहे.
शेअर करा:

More from राजकारण

पुणेतील राहुल गांधीची लोकप्रियता लक्षात घेऊन परवेज खानचा दावा, म्हणाले- देशाचे पुढचे पंतप्रधान राहतील राहुल
राजकारण

पुणेतील राहुल गांधीची लोकप्रियता लक्षात घेऊन परवेज खानचा दावा, म्हणाले- देशाचे पुढचे पंतप्रधान राहतील राहुल

२५ ऑग, २०२६
मंत्रिमंडळ बैठकीनंतर ‘डिनर डिप्लोमेसी’, वर्षा बंगलेवर फडणवीस-शिंदे-सुनेत्रा पवार एकत्रित होतील
राजकारण

मंत्रिमंडळ बैठकीनंतर ‘डिनर डिप्लोमेसी’, वर्षा बंगलेवर फडणवीस-शिंदे-सुनेत्रा पवार एकत्रित होतील

२४ ऑग, २०२६
ठाणेकरांच्या डोक्यावर २,८०० कोटींचा TDR का.......?
राजकारण

ठाणेकरांच्या डोक्यावर २,८०० कोटींचा TDR का.......?

२१ ऑग, २०२६